
गडचिरोली- मणिपूरात दोन आदिवासी महिलांची धिंड काढून त्यांच्या भावाला व वडीलांना ठार मारणाऱ्या मारेकरी व अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा घ्यावी. तसेच मणिपुर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा सोबतच सांगली जिल्ह्यातील बेडग गावाच्या सिमेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उभारलेली कमान उध्वस्त करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करावे. बेडग गावातील आंबेडकरी जनतेला संरक्षण घ्यावे. आदि मागणीसाठी कुरखेडा येथे आदिवासी व आंबेडकरी जनतेचा मोर्चा बाजार चौकापासून तहसिल कार्यालया पर्यत पोहचला. कुरखेडा चे तहसिलदार धनपाते यांना निवेदन देण्यात आले. _ मोर्च्याचे रुपातंर सभेमधे होवून RPI चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली यात माजी जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी ' गोंगपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी , प्रा. रमेश कोरचा , आशाताई तुलावी ' मुकेश खोब्रागडे, एडव्होकेट सि. एम. जनबंधू , संजय कोकोडे आदिंनी मार्गदर्शन केले ,केंद्र व मणिपुर राज्य सरकारचा निषेध नोंदविला. सदर मोर्च्यात प्रामुख्याने आदिवासी बांधव श्रीराम दुगा , महादेव वट्टी , रामा कि रंगे ' भोजराज आत्राम 'रुषी सय्याम ' कैलास कांटेगे , ,रामदास उईके , , सौ उमसिला हलामी , सौ. माहेश्वरी होळी , वंदना केरामी ' कल्पना किरंगे , शितल मडावी , जयवंता कांटेगे' शालीनी गावळे , वट्टे मॅडम तर RPI चे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर , उपाध्यक्ष मारोती भैसारे , तालुकाध्यक्ष प्रमोद सरदारे , युवा नेता संतोष खोब्रागडे, नाजुक भैसारे , रमेश जोगी , ज्ञानेश्वर सहारे , मोहन मेश्राम, केदारनाथ रामटेके , अमोल करांडे 'अनिल बांबोळे , दादाजी रामटेके , दिलंबर जोगी ' अशोक अंबादे, सुरेद्र सरदारे , जितेंद्र सहारे , आदि सहीत आंबेडकरी अनुयायी बहुसंख्येनी उपस्थित होते.
