हैद्राबाद - तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका अपार्टमेंटमध्ये दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. या सर्वांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. Crime news
पालकांनी आधी मुलांना विष पाजले, नंतर स्वतः खाऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Crime story's
हे संपूर्ण प्रकरण कुसाईगुडा येथील आहे. सतीश (३९ वर्षे) हे कुसाईगुडा पोलीस ठाणे हद्दीतील कांडीगुडा येथील क्रांती रॉयलाल अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहत होते. कुटुंबात पत्नी वेद (३५ वर्ष), मुले निशिकेत (०९ वर्ष) आणि निहाल (०५) यांचा समावेश होता.
शेजाऱ्यांना सतीशच्या घरात कोणतीही हालचाल न दिसल्याने त्यांना काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटली. पोलिसांनाही कळवण्यात आले. कसेतरी पोलीस घरात घुसले तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले.
या चौघांचाही शुक्रवारी रात्री मृत्यू झाला असावा, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याची माहिती शनिवारी दुपारी मिळाली.
कुशाईगुडा पोलिस स्टेशनचे प्रभारी पी व्यंकटेश्वरलू यांनी शेजाऱ्यांची चौकशी केली. दोन्ही मुले मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समोर आले आहे. सतीशने त्याच्यावर खूप उपचार केले, पण ते बरे होत नव्हते. त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला.
त्यामुळे हे दाम्पत्य तणावाखाली राहत होते. नैराश्यात त्याने आधी मुलांना विष पाजले आणि नंतर स्वतः ते प्राशन केले, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबत अजूनही तपास सुरूचं आहे.